बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील, सुलतानपूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत, प्रतिस्पर्धी उम्मेदवारचं. 2017
ची जात वैधता, प्रमाणपत्राच्या पावतीवर, छाननीत आक्षेप नोंदवूनही, दखल न घेणाऱ्या, निवडणूक निर्णय
अधिकाऱ्यावर कारवाई करूण, सौ उज्वला प्रल्हाद मोरे यांना अपात्र घोषीत करून, स्वतःला
विजयी घोषित करण्याची मागणी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि तथा जिल्हाधिकारी
यांच्याकडे, ''सागर पनाड'' यांनी केली आहे.
लोणार
तालुक्यातील सुलतानपूर, ग्रामपंचायत ची वार्ड क्रमांक पाच मागासवर्गीय एका जागे
साठीची, पोटनिवडणुक 23 जुनला झाली. यावेळी पाच उमेदवारांनी, उमेदवारी अर्ज दाखल केले
होते. दरम्यान तिन अर्ज मागे, घेण्यात आले. छाननीच्या वेळी प्रतिस्पर्धी, उम्मेदवार उज्वला प्रल्हाद मोरे, यांनी आपल्या उमेदवारी, अर्जासोबत जिल्हा, जातप्रमानपत्र पडताळणी, समिती कडे दाखल केलेल्या, पाच सप्टेबर 2017 ची पावती क्रमांक
235319 लावली असून, निवडणुक आयोगाच्या नियमा प्रमाणे, अद्यावत जात प्रमाणपत्र, समीतीची प्रस्ताव दाखल, केल्याची पावती, कींवा समीतीचे पत्र, दाखल
नकेल्याने, छाननीच्या दिवशी लेखी हरकत, घेवून सौ. उज्वला प्रल्हाद मोरे, यांचा उमेदवारी अर्ज
रद्द करावा, अशी लेखी हरकत घेतली होती.
हरकत योग्य असतांना, देखील प्रतिस्पर्धीचे
पती सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असल्याने, व गावातील सत्ताधारी, प्रस्तापीतांच्या दबावाखाली, निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी माझी हरकत अमान्य केली, तर जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळी, कार्यालयात जात प्रमाणपत्र, पडताळी विनियमन, नियम 2012 मधील नियम 17(2) नुसार विजय उमेदवाराच्याच, प्रस्तावाची
पडताळणी होते.
इतर प्रस्ताव खारीज करण्यात येतात असे पत्र, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी, कार्यालयातून प्राप्त असल्यामुळे, सन 2019 च्या पोटनिवडणुकीत, सौ उज्वला मोरे यांची 2017 ची, जात प्रमाणपत्र पडताळणी, समिती कडील दाखल प्रस्तावाची पावती, ग्राह्य होवु
शकत नाही. त्यामुळे सौ .मोरे यांच्या, उमेदवारी अर्जावर घेतलेली हरकत, ग्राहय धरल्या गेली असती, तर केवळ एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहल्याने. ही
पोटनिवडणुक बिनविरोध झाली असती. मात्र लोणार निवडणुक, निर्णय अधिकाऱ्यांनी, माझ्या हरकती वर कोणतीही, चौकशी न करता, सौ उज्जवला प्रल्हाद मोरे यांचा, उमेदवारी
अर्ज निवडणुक, आयोगाचे नियम डावलून, खारीज केला नाही.
आणि जर निवडणुक आयोगाच्या
नियमानुसार, सौ. उज्वला प्रल्हाद मोरे, यांचा उमेदवारी अर्ज खारीज केला असता, तर मी
बिनविरोध विजयी झालो असतो. निवडणुकीसाठी मतदारांना निवडूकीला सामोरे जावे लागत नव्हते. आणि निवडणुकी करिता लागणारा पैसा वाचला असता, निवडणुक आयोगाच्या, नियमाचा भंग केल्याने, लोणार निवडणुक निर्णय, अधिकारी यांच्यावर कडक कारवाई, करूण
प्रतिस्पर्धी उमेदवार, सौ उज्जवला प्रल्हाद मोरे यांना अपात्र करून मला, विजयी घोषीत
करण्याबाबतची तक्रार, जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, तथा जिल्हाधिकारी बुलडाणा, यांच्याकडे सागर पनाड यांनी केली आहे. असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी सागर झणके यांनी कळविले आहे..
No comments:
Post a Comment