स्वाभिमानीचा उपोषणाचा ईशारा....रस्ताचे काम तात्काळ करा....
जयइंडिया जयभारत न्यूज बुलडाणा प्रतिनिधी सागर झणके
शेतरस्ता तात्काळ मोकळा करून द्या,स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागनी.
बुलढाणा :
संग्रामपूर तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने, कळमखेड शिवारातील बोडखा रसत्यावर, प्रचंड प्रमाणात गाळ आणि पाणि, साचल्याने सदरहू शेतरस्ता बंद झाला आहे. त्यामुळे
लवकरात लवकर रस्ता, व्यवस्तीत करून मार्ग मोकळा करावा, या मागनीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा
अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन
तहसिलदार यांना देण्यात आले.
प्रधानमंत्री
सडक योजनेचे, काम गेल्या कित्येक महिन्यापासून काकोडा ते जस्तगाव, दरम्यान चालू असून, त्या रोडला जोडल्या गेलेल्या रसत्यात, खोदकाम करून पाणी अडवल्याने, शेतकऱ्यांचे जाने येने बंद झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात, शेती पडीत
पडण्याच्या मार्गावर आहे.
सतत चार वर्ष दुष्काळाच्या सावटाखाली, जगत असलेल्या
शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा शेत पडीत पडते की काय?असा प्रश्न णिर्माण झाला आहे.
या समस्येवर तात्काळ निर्णय घेवून, शासनाने शेतरस्ता सुवळीत करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल, असा ईशाराही स्वाभिमानी संघटणेचे, युवा जिल्हाअध्यक्ष प्रशांत डिक्कर, यांनी निवेदनातून दिले आहे.
निवेदनावर सुनिल
खडेराव,अंबादास मिरगे,मोहण खंडेराव एकनाथ खंडेराव, शुभम खंडेराव,विलास खंडेराव,गजानन खंडेराव याच्या सह्या आहेत. असे वृत्त जय इंडिया जय भारत बुलडाणा प्रतिनिधी सागर झणके यांनी कळविले आहे...
जयइंडिया जयभारत न्यूज बुलडाणा प्रतिनिधी सागर झणके
No comments:
Post a Comment