www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Thursday, April 25, 2019

पाण्याचे नियोजन म्हणजे काय ?

water
पाण्याचे नियोजन म्हणजे काय ? या विषयी दोन गोष्टी सांगायच्या आहेत. नियोजन कशाचेही असो त्यामागे कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त उत्पादन करणे हा हेतू असतो. पैशाचे नियोजन असेच केले जाते. कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कामे कशी होतील ? याचा विचार करणे म्हणजे पैशाचे नियोजन. ते नियोजन करण्याआधी आपल्याकडे किती पैसे आहेत हे बघावे लागते. त्यानंतर आपल्या जवळ असलेल्या पैशातून कोणते काम करायचे आहे, त्याला किती पैसे लागणार आहेत याची माहिती घ्यावी लागते. पैसे कमी असतील आणि कामाची गरज मोठी असेल तर ? आता काय करावे असा प्रश्‍न पडतो. मग सुरू होते नियोजन. पैशाची गरज नीट तपासली जाते. काही वस्तू खरेदी करायच्या आहेत तर त्या कमी भावात मिळतील का ? याचा अंदाज घेतला जातो. काही ठिकाणी माणसे लावली जातात. माणसांनी करायची कामे कमीत कमी माणसात कशी होतील याचा विचार केला जातो. काटकसर करून आपल्या जवळ असलेल्या पैशातच ते काम कसे करून घेता येईल याची कोशीश केली जाते. त्यालाच म्हणतात नियोजन.
नियोजन करायला सुरुवात करतो तेव्हा एवढ्या पैशात हे काम होणे शक्यच नाही असे वाटत असते. पण काटकसरीचा विचार करायला लागतो. तसे ते काम तेवढ्या पैशात तर होतेच पण काही पैसे शिल्लकही राहतात. त्यामुळेच कोणताही व्यापारी आणि उद्योजक आपल्या जवळच्या साधनांचा आणि होणार्‍या खर्चाचा वापर बारकाईने विचार करीत असतो. शेतकरीवर्ग असे नियोजन करीत नाही. आपण पाण्याचा विचार करू. आपण शेतात उभ्या असलेल्या पिकाला पाणी देतो पण आपण देतो तेवढे पाणी त्या पिकाला आवश्यक आहे का? याचा विचार करीत नाही. याबाबत दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे पीक चांगले येण्यासाठी भरपूर पाणी लागत नाही. नेमक्या शब्दात सांगायचे तर पिकांना ‘मोजकेच’ पाणी लागते आणि ‘वेळेवर’ लागते. आपण जे पीक घेतो, त्या पिकाच्या वाढीच्या कोणकोणत्या अवस्थांत त्यात पाणी दिले पाहिजे, याची माहिती आधी घेतली पाहिजे आणि त्या त्या वाढीच्या अवस्थांत त्याला पाणी मिळेल याची योजना आखली पाहिजे. उगाच कधीही पाणी देत राहणे हा पाण्याचा गैरवापर आहे. या अवस्थेत सुद्धा आपण किती पाणी दिले पाहिजे याचा विचार करून तेवढेच पाणी दिले पाहिजे.

मोदी विरुद्ध प्रियंका? नव्हे, काँग्रेसचे मानसिक युद्ध


युद्धशास्त्रात एक प्रकार असतो माईंड गेम म्हणजे मानसिक युद्ध. यात प्रतिस्पर्ध्याला मानसिक पातळीवर खेळवण्यात येते आणि या खेळातील परिणामांवरून प्रत्यक्ष युद्धाचा निकाल ठरतो. उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवण्यावरून काँग्रेस अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाशी मानसिक युद्ध खेळले, असे म्हणता येईल. अखेर अजय राय यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने ही जागा मोदींसाठी सोपी केली, परंतु त्यावर रंगलेले राजकारण खुमासदार होते.
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस असलेल्या प्रियंका गांधी वाड्रा वाराणसी मतदारसंघात निवडणूक लढवणार का नाही, याबाबत निश्चित ठरत नव्हते. प्रियंका गांधी यांच्या गंगा यात्रेत सहभागी झालेल्या शालिनी यादव यांना तर समाजवादी पक्षाने वाराणसीतच उमेदवारी दिली. मात्र प्रियंका गांधी यांचा सस्पेन्स काही संपायचे नाव घेत नव्हता. याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना छेडले असता, ‘थोडासा सस्पेन्स ही चांगली गोष्ट आहे,’ असे सांगून त्यांनी गूढ वाढवले. प्रियंका गांधी यांना याबाबत विचारले असता, पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण जरूर निवडणूक लढवू, असे सांगून त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. त्यामुळे या मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात काँग्रेसलाच रस आहे की काय, असे वाटू लागले.

वैजापूर ता. जिल्हा औरंगाबाद, येथे मतदानाला प्रचंड प्रतिसाद..

वैजापूर तालुक्यातील सर्वच, गावात नागरिकांनी मतदानाला प्रचंड प्रतिसाद दिला. अगदी सकाळ पासूनच, मतदानाला प्रचंड गर्दी झाली होती तालुक्यातील  लोणीखुर्द,टुनकी जोम्बी पिंपळ गावं, मैनेगाव, साकेगाव, गरज, पोखरी ,भरणा, शिऊर,गोंदेगाव,निमगाव, इत्यादी गावात प्रचंड मतदान झाले आहे असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधींनी कळविले आहे 


ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक,मनोहर टकसाळ यानि मतदान केले....


जालना लोकसभा निवडणूक 2019,श्री.विलास केशवराव औताडे

मतदानाचा हक्क मूळ गाव/मतदान केंद्र पळशी, ता.जि. औरंगाबाद येथे बजावला....


जालना लोकसभा निवडणूक २०१९  श्री.विलास केशवराव औताडे यांनी  सकाळी ठीक 8:30 वाजता मतदानाचा हक्क मूळ गाव/मतदान केंद्र पळशी, ता.जि. औरंगाबाद येथे बजावला.




अवैध रित्या रंधा मशिन आणि तीन नग सागवान, लाकडे एवढा मुद्देमाल जप्त करन्यात आला.

वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद, यांना मिळालेल्या गुप्त माहितिच्या आधारे..


    24/4/2019 रोजी,जामोद येथिल शेख राजिक शेख सरदार यांच्या रंधा मशिनवर, अवैधरित्या सागवान चौरस कट साईज करतांना धाड टाकन्यात आली.सदरहु आरोपी हा सागवान चौरस कापताना आढळून, आल्याने त्यास पकडन्यात आले, त्याच्या कडून घटना स्थळावरून एक रंधा मशिन ,तीन लाकडी नग असे 78,487 रुपयाचा  ऐवज मुद्देमाल जप्त करन्यात आला.
         राऊंड  आँफिसर एस.जी.खान.जळगाव जामोद, वनरक्षक एम.आर. बारेला, जी.आर. सोळंके,के एन सलामे,पांडू धाडेकर आणि हंगामी मजूर शेख शकिल.शेख वकिल,सोहम गोरे,गनेश पाटिल याच्या पथकाने, ही  कार्यवाही  केली असून,आरोपी शेख.राजीक.शेख सरदार, यांचे विरुद्ध अपराध क्रमांक 615/22/ दि.24/4/2019 जारी करून 1927 चे कलम (26)1 ग. ह.४१,४२,५२,नुसार  कार्यवाही केला आहे. पुढिल तपास रांउड आँफिसर एस. जी खान  करित आहे.असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधींनी कळविले आहे 

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

               हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...

DEPARTMENTS

Girl in a jacket